समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिल्लीतील बॉम्बस्फोटावर प्रतिक्रिया देताना एक मोठे विधान केले आहे. 'अन्याय आणि जुलूम यातूनच दहशतवाद जन्माला येतो,' असे ते म्हणाले. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हे इंटेलिजन्सचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान आणि राष्ट्रपती जिथे राहतात तिथे असा हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणाले. निरपराध लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नये, असे सांगताना त्यांनी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटाचा संदर्भ दिला. तसेच, निवडणुका जवळ आल्या की अशा घटना घडतात, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. खऱ्या गुन्हेगारांना शोधून सहा महिन्यांत फाशी द्यावी, अशी मागणीही आझमी यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.