Ind vs aus 1st odi: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला.
या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या सामन्याचे हिरो ठरले. मात्र रवींद्र जडेजालाच सामनावीर पुरस्कार का देण्यात आला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. समजून घ्या काय आहे यामागचं कारण.
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. (Latest sports updates)
दोघांनी मिळून प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. या अप्रतिम कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर संपुष्ठात आला.
मोहम्मद शमीने या डावात मोहम्मद शमीने ६ षटक गोलंदाजी करत अवघ्या १७ धावा खर्च केल्या आणि २ निर्धाव षटक टाकत ३ गडी बाद केले.
भारतीय संघ जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी अवघ्या १६ धावांवर ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर ८३ धावसंखयेवर आर्धा संघ माघारी परतला होता.
त्यावेळी केएल राहुल खेळपट्टीवर टिकून राहिला आणि नाबाद ७५ धावांची खेळी केली. तर त्याला रवींद्र जडेजाने साथ देत ४५ धावांची खेळी केली. तसेच गोलंदाजी करताना २ गडी देखील बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रवींद्र जडेजालाच पुरस्कार का?
क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार देण्याचं मानक ठरलेलं आहे. १ विकेटसाठी २५ पॉईंट्स तर १ रनसाठी १ पॉईंट. या समान्यत केएल राहूलने ७५ धावा केल्या होत्या.
त्यामुळे त्याचे ७५ पॉईंट्स होते. तर मोहम्मद शमीने देखील ३ विकेट्स घेत ७५ पॉईंट्सची कमाई केली. तर रवींद्र जडेजाने ४५ धावा केल्या आणि २ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे रवींद्र जडेजाने एकूण पॉईंट्स हे दोघांपेक्षा अधिक असल्याने रवींद्र जडेजा या पुरस्काराचा मानकरी ठरला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.