virat kohli with rohit sharma twitter
क्रीडा

IND vs BAN, Super 8: टीम इंडियाचा डाव फसला! विराट- रोहितची जोडी पुन्हा एकदा फ्लॉप; पाहा स्पर्धेतील कामगिरी

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील सामना सुरु आहे. हा सामना अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्ड्स मैदानावर सुरु आहे. सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ४७ धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही.

भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला या स्पर्धेत हवी तशी सुरुवात करुन देता आलेली नाही.

विराट- रोहितची जोडी फ्लॉप

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करायला मैदानावर येणार अशी चर्चा सुरु होती. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानावर येत आहे. मात्र दोघांनाही संघासाठी चांगली सुरुवात करुन देता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात या जोडीने २२ धावा जोडल्या होत्या.

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात या जोडीला १२ धावा जोडता आल्या होत्या. अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात दोघांना १ धाव जोडता आली होती. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ११ आणि बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात दोघांना ३९ धावा जोडता आल्या आहेत.

यापूर्वी रोहित सलामीला यायचा तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्यामुळे सलामी जोडी फ्लॉप झाल्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर येऊन डाव सांभाळायचा मात्र आता दोघेही लवकर बाद झाल्याने भारतीय संघावर दबाव येतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Marathi News Live Updates : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

Yoga: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT