Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार Saam Tv
Sports

Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार

काही दिवसांपुर्वी विराटच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

वृत्तसंस्था

बराच काळ विराटच्या कर्णधारपदाबाबत चर्चा होती. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) संपल्यानंतर तो टी-20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. गुरुवारी, 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली आहे की, तो टी -20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. यानंतर, तो भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. विराट कोहलीच्या या खेळीनंतर आता रोहित शर्माला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची सर्व शक्यता आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याचा विक्रम उत्कृष्ट आहे.

विराटने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माला या फॉरमॅटमध्ये संघाची कमान सोपवण्याचा निर्णय घेण्यात येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विराटच्या जागी बऱ्याच दिवसांपासून त्याला या फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्याची मागणी होत होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT