Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार Saam Tv
क्रीडा

Big Breaking: विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधार पद सोडणार

वृत्तसंस्था

बराच काळ विराटच्या कर्णधारपदाबाबत चर्चा होती. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) संपल्यानंतर तो टी-20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. गुरुवारी, 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली आहे की, तो टी -20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. यानंतर, तो भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. विराट कोहलीच्या या खेळीनंतर आता रोहित शर्माला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची सर्व शक्यता आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याचा विक्रम उत्कृष्ट आहे.

विराटने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माला या फॉरमॅटमध्ये संघाची कमान सोपवण्याचा निर्णय घेण्यात येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विराटच्या जागी बऱ्याच दिवसांपासून त्याला या फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्याची मागणी होत होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT