hardik patil , ironman , virar saam tv
Sports

तब्बल १८ वेळा हार्दिकनं भारताचा झेंडा फडकविला साता समुद्रापार; वाचा पाटलांची कामगिरी

हार्दिकचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

चेतन इंगळे

Hardik Patil Ironman : एक दाेन वेळा नव्हे तर तब्बल १८ वेळा ट्रायथलाॅन स्पर्धा पुर्ण करुन आर्यनमॅनचा किताब पटकाविणारे विरारचे (virar) हार्दिक पाटील ठरले आहेत. पाटील यांनी १५ वी कलमार-स्वीडन २०२२ स्पर्धेत नुकतेच यश मिळविलं आहे. पाटील हे १८ वेळा आयर्नमॅनचा (ironman) किताब पूर्ण करणारे पहिले व एकमेव भारतीय ठरले आहेत. पाटील यांच्या यशानं वसई विरारकरांसह प्रत्येक भारतीय नागरिकाचा ऊर भरुन आला आहे.

विरारमध्ये राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील याने १५ वी 'कलमार-स्वीडन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा २०२२ यशस्वीरित्या नुकतीच पार केली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मागील १० आठवड्यामध्ये हार्दिक याने २ आयर्नमॅन स्पर्धा तालीन, एस्टोनिया व तर १ स्पर्धा कलमार- स्वीडन येथे अशा तीन आयर्नमॅन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

आयर्नमॅन स्पर्धा १५ वेळा पूर्ण करणारा हार्दिक पाटील हा दुसरा भारतीय ठरला आहे. हाफ आयर्नमॅन स्पर्धा हार्दिकनं १८ वेळा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे तो पहिला व एकमेव भारतीय ठरला आहे. हार्दिकच्या या कामगिरीबद्दल विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.

हार्दिकचे सर्व स्तरावरून (sports) कौतुक केले जात आहे. दरम्यान सातत्याने सराव केल्याने हे यश मिळाले आहे. 3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणे अशी आव्हाने १७ तासांत पूर्ण करण्याचे लक्ष आयर्नमॅन स्पर्धेत स्पर्धेकांसमोर असते असे हार्दिक पाटीलनं नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT