T20 World Cup Team India Cricket News Update / BCCI Twitter SAAM TV
Sports

T20 World Cup : टीम इंडियाचं टी-२० वर्ल्डकप जिंकणं पक्कं; यावेळी जुळून आलेत दोन उत्तम योग

टी २० वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Nandkumar Joshi

T20 World Cup Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ टी २० वर्ल्डकप मिशनसाठी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला आहे. टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. (India Vs Pakistan) हा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणार आहे. खेळाडू आणि त्यांचा फॉर्म बघता यावेळी भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

भारतीय संघ टी २० वर्ल्डकप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कारण यावेळी दोन उत्तम योग जुळून आले आहेत. (Latest Marathi News)

आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत दोनदा वनडे वर्ल्डकप विजेतेपद आणि एकदा टी २० वर्ल्डकप विजेतेपद पटकावले आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप स्पर्धा जिंकली. त्यानंतर सहा स्पर्धांमध्ये म्हणजेच, १९८७, १९९२, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ पर्यंत टीम इंडियाला विजेतेपद पटकावता आलेले नाही. याचदरम्यान २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर टीम इंडियानं २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार होता. १९८३ नंतरची ही सातवी स्पर्धा होती. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी २० वर्ल्डकप जिंकला होता. आता त्यानंतर ही सातवी स्पर्धा आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. आता सहा स्पर्धा म्हणजेच २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६ आणि २०२१ मध्ये स्पर्धा झाल्या आहेत. अशावेळी पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याचा योग जुळून आला आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेआधी भारतीय संघाला दोन सराव सामने (अनऑफिशियल) आणि दोन ऑफिशियल सराव सामने खेळायचे आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने आहेत. त्यातील एका सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर दुसरा सामना आज होत आहे. त्यानंतर भारतीय संघाला दोन ऑफिशियल सराव सामने खेळायचे आहेत. १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांविरुद्ध होणार आहेत.

हा सुद्धा एक चांगला योग आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये टी २० वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघ दोन सराव सामने खेळला होता. त्यावेळीही दोन्ही सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध झाले होते. २००७ मध्ये ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्डकप डिफेंडिंग चॅम्पियन होता. यावेळी टी २० वर्ल्डकप डिफेंडिंग चॅम्पियन आहे. त्यामुळे योग जुळून आला आणि मनासारखं घडलं तर, यावेळी भारतीय संघ टी २० वर्ल्डकप स्पर्धा जिंकणार हे निश्चित आहे.

टी २० वर्ल्डकप संघासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT