भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील दुसरा सामना आज एडिलेड ओव्हल मैदानावर खेळवला जातोय. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतीय टीमने ९ विकेट्स गमावून २६४ रन्स केले. या सामन्यात रोहित शर्मा ७३, श्रेयस अय्यर ६१ आणि अक्षर पटेल ४४ रन्सची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. हर्षित राणानेही १८ चेंडूंमध्ये नाबाद २४ रन्स करत शेवटी धावसंख्या मजबूत केली.
टॉस हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. पण टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. केवळ १७ रन्सवर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल ९ रन्स करून जेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये बार्टलेटने विराट कोहलीलाही शून्यावर बाद केलं. कोहली सलग दुसऱ्या सामन्यात भोपळा न फोडता बाद झाला.
यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ रन्सची पार्टनरशिप केली. या दोन्ही फलंदाजांच्या पार्टनरशिपमुळे भारताचा डाव सावरला. रोहितने ७४ बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं २०१५ नंतरचं सर्वात संथ अर्धशतक ठरलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५९वे अर्धशतक होतं. श्रेयस अय्यरनेही ६७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
रोहित आणि आय्यर यांची भागीदारी मिचेल स्टार्कने तोडली. त्याने रोहितला जोश हेजलवूडच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने ९७ चेंडूंमध्ये ७३ रन्स केले. ज्यामध्ये ७ फोर आणि २ षटकार होते. यानंतर काही वेळातच श्रेयसही बाद झाला. त्याने ७७ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ६१ रन्स केले.
यानंतर केएल राहुल (११), वॉशिंगटन सुंदर (१२) आणि नीतीश कुमार रेड्डी (८) या तिन्ही खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. मात्र अक्षर पटेलने ४४ रन्स करत भारताला २०० रन्सच्या पार नेण्यात मदत केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये हर्षित राणा (२४*) आणि अर्शदीप सिंह (१३) यांनी चांगली फलंदाजी करत भारताला मजबूत स्कोअर मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.