आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. सेमीफायनलमध्ये कोणता संघ जाणार हे, याच सामन्याच्या निकालावरून स्पष्ट होईल. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १५१ धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५२ धावांची गरज आहे.
शारजहा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या ग्रेस हॅरिसने चांगली सुरुवात करून देत ४० धावा चोपल्या. त्यानंतर बेथ मुनी २ तर वेअरहॅम शून्यावर माघारी परतली. कर्णधार मॅकग्राने ३२ धावांची खेळी केली. तर एलिस पेरीने शेवटी महत्वपूर्ण खेळी करत संघाची धावसंख्या धावांवर पोहोचवली.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, रेणुका सिंग आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर पूजा वस्त्राकर आणि राधा यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला.
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी (यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन
भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.