harmanpreet kaur twitter
क्रीडा

IND-W vs NZ-W: हरमनप्रीतला राग अनावर; पराभवानंतर या खेळाडूंवर भडकली; सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Ankush Dhavre

Harmanpreet Kaur On Team India Defeat: आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. यासह पराभवाचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे.

काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

या सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली की, ' आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू शकलो नाही. तर त्यांनी शानदार खेळ केला. आम्हाला संधी मिळाली, मात्र आम्ही त्या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करू शकलो नाही. आम्ही क्षेत्ररक्षणात खूप चुका केल्या. आम्हाला यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. आम्ही याआधीही १६०-१७० धावांचा पाठलाग केला आहे. यावेळीही आम्हाला आशा होती की, आम्ही करू शकतो.'

तसेच ती पुढे म्हणाली की, ' आमच्या संघातील कुठल्याही एका फलंदाजाला मोठी खेळी करायची होती. मात्र आम्ही विकेट्स गमावल्या. हा ग्रुप जरा कठीणच असणार आहे. आम्हाला चांगली सुरुवात करता आलेली नाहीये. मात्र यापुढे आम्ही चांगलं क्रिकेट खेळू. स्पर्धेतील प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला २० षटकअखेर ४ गडी बाद १६० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १९ षटकात १०२ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला हा सामना ५८ धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान भारतीय संघाचा पुढील सामना ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT