सरकारनामा

VIDEO | कृषी खातं झोपलंय काय? बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

साम टीव्ही

राज्यातला सोयाबीन शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय. या शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनून बच्चू कडू पुढे सरसावलेत. यावेळी बच्चु कडूंनी थेट शिवसेनेवरच प्रहार केलाय.


शेतकऱ्यांबाबत कृषी विभाग अजिबात गंभीर नसल्याची टीका ठाकरे सरकारवर झालीय. आणि ही टीका दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर सरकारमधल्या एका मंत्र्यानेच केलीय. कृषी खातं झोपलंय का? असा सवाल करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिलाय.

यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झालाय. जे पेरलं ते उगवलच नाही. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांसंदर्भात राज्यभरातून तक्रारी येतायत. त्या तक्रारींची दखल घेत खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत दिली जाणार आहे.

'गेल्या 50 वर्षांपासून हेच सुरू आहे. त्यामुळे बोगस  बियाणे बनवणाऱ्या कंपनीच्या मालकालाच  चोपल पाहिजे' 

सत्तेबाहेर असताना आपल्या हटके आंदोलनांनी सरकारला सळो की पळो करून सोडणारे बच्चू कडू शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून आता सरकारमध्ये आहेत. पण त्यांची आजची भूमिका पाहता शिवसेनेला त्यांचा पाठिंबा आहे की बच्चू भाऊ सेनेला धक्का देणार असा सवाल उपस्थित झालाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology Tips: पितृ पक्ष आणि श्राद्धावेळी काळ्या तीळांचा वापर का केला जातो?

Today's Marathi News Live : बारामतीनंतर अजित पवारांची शिरुरमध्ये फिल्डिंग; मतदारसंघात सभांचा धडाका

RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

Renuka Shahane Post : "....तर त्यांना मत देऊ नका"; 'नोकरीत मराठी माणूस नको'च्या पोस्टनंतर रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप

बारामती लाेकसभा मतदारसंघात मंगळवारी रात्री तिघांकडून हवेत गोळीबार, नागरिकांत घबराहट

SCROLL FOR NEXT