Water on rationing? 
बातमी मागची बातमी

10 वर्षांत पाण्याची भीषण टंचाई,पाणी मिळणार रेशनिंगवर?

साम टीव्ही

कितीही पाऊस पडला तरी राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झालीय. हिच स्थिती कायम राहिल्यास पुढच्या 10 वर्षांत पाणी रेशनिंगवर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात पाण्याचा वापर वाढतोय. पण पाणी अडवलं आणि जिरवलं जात नाही. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाही. पाणी रेशनिंगवर मिळेल तो दिवस फार दिवस लांब नाही. सध्याचा भूगर्भातील पाणी उपसा आणि जलप्रदूषणाचं प्रमाण पाहता येत्या दहा वर्षांत राज्यातल्या काही ठिकाणी पाणी रेशनिंगवर देण्याची वेळ सरकारवर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला सध्या 2 हजार 18 टीएमसी एवढ्या पाण्याची गरज लागते. येत्या काळात राज्यातील कृषी, औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढेल. ही गरज 5 हजार 707 टीएमसी एवढी असेल. उपलब्ध पाणी आणि गरज याचा मेळ घालण्यासाठी पाण्याचं रेशनिंग करावं लागेल. हे टाळण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवावी लागेल. शिवाय महाराष्ट्राची भूजल पातळीही वाढवावी लागेल. त्यासाठी गाव पातळीवर उपाययोजना कराव्या लागतील.

वीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ एवढी वाढेल याची कुणाला कल्पनाही नव्हती. त्याचप्रमाणं येत्या काळात रेशनिंगवर पाणी मिळेल ही आता वाटत असलेली कल्पनाही सत्यात उतरु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT