Prashant Kishor on BJP Saam TV
देश विदेश

Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण? प्रशांत किशोर यांनी दिलं उत्तर

Prashant Kishor on Lok Sabha Election 2024 Results: प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेल्या पराभवाचे कारण सांगितले आहे.

Satish Kengar

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेल्या पराभवाचे कारण सांगितले आहे. याशिवाय भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण, हेही त्यांनी सांगितलं आहे.

प्रशांत किशोर म्हणाले आहे की, भाजपचे 208 जुने खासदार विजयी झाले. पण हरले तेच आहेत जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले. पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी ठिकाणी योग्य उमेदवारी न दिल्याने त्यांचा पराभव झाला.

ते म्हणाले, भाजपला हे माहित होते आणि त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात कोणते उमेदवार पराभूत होत आहेत, हे देखील समोर आले होते. मात्र त्यांनी काळजी न करता पंतप्रधान मोदींची सभा झाली तर विजय होईल, असा विश्वास ठेवत तिकीट दिले. अशा अनेक जागा आहेत, जिथे भाजपने सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन तिकिटे दिली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया टुडेशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, “ज्याने पहिल्यांदा 400 पारचा नारा लिहिला, त्यात काही चुकीचं नव्हतं. मात्र 400 च्या पुढे जागा का हव्यात, याचे कारण त्यांनी सांगितलं नाही. यामुळेच 400 पारचा नारा हा काही लोकांना अहंकार वाटू लागला. तर काहींना हे षडयंत्र वाटले, ज्याचे भांडवल करून विरोधकांनी भाजप संविधान बदलतील, असं सांगितलं.''

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, भाजपचा 400 पारचा नारा ज्याने लिहिला, त्याने तिथे सर्वात मोठी चूक केली. 400 पारचा हा नारा आला तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी 400 पारची गरज असल्याचे सांगितले. यामुळे भाजपचे सर्वत्र नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT