जयपूर रिंग रोडवर कार उलटून झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू
मृतांमध्ये दोन लहान मुलांचा आणि दोन महिलांचा समावे
कुटुंब हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परताना झाला अपघात
पोलीस घटनास्थळी दाखल
राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. जयपूरच्या वाटिका रिंग रोडवर अपघाताची घटना घडली. कारमधील कुटुंब हरिद्वारहून परतत असताना चालकाचं कारवरील नियंत्रण गमावून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्वांना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या वाटिका रिंग रोडवर चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कारमधील दोन मुले, दोन महिलांसहित सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ३ पुरुष, २ महिलांसिहत ७ जण दगावले. कारमधील कुटुंब हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परताना हा अपघात झाला.
जयपूर वाटिका रिंग रोडवर अपघातानंतर कार उलटली. अपघतामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह पोस्टपार्टमसाठी रुग्णालयात पाठवले.
चाक्सू एसीपी सुरेंद्र सिंह आणि शिवदासपुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र कुमार सैनी यांनी या घटनेची माहिती दिली. मृतांची नावेही समोर आली आहे. मृतांमध्ये रामराज वैष्णव, पत्नी मधू आणि मुलगा रुद्र यांचा मृत्यू झाला. तर नातेवाईक काळूराम, त्यांची पत्नी सीमा, मुलगा रोहित, गजराज यांचा समावेश आहे. मृत लोक जयपूरमधील फुलियावास केकरी आणि वाटिका येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.