Supreme Court hearing sedition Law SAAM TV
देश विदेश

Sedition Law: ...तोपर्यंत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू नका असे का सांगत नाही?: SC

राजद्रोह कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

साम ब्युरो

नवी दिल्ली: राजद्रोह कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. राजद्रोह कायद्यावर फेरविचार करणार असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सादर केलं होतं. त्यावर कोर्टानं अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रलंबित आणि भविष्यातील प्रकरणांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे, असे आदेश कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत. राजद्रोह कायद्यावर फेरविचार करेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण कसे करणार, याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही कोर्टाने नमूद केले. तत्पूर्वी, जोपर्यंत केंद्र सरकार या कायद्यावर फेरविचार करत आहे, तोपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केंद्रानं कोर्टाकडे केली. त्यावर याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी विरोध दर्शवला.

जी प्रकरणं प्रलंबित आहेत आणि भविष्यात दाखल होणाऱ्या प्रकरणांबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश कोर्टाने केंद्र सरकारला दिले. तसेच जोपर्यंत केंद्राकडून या कायद्यावर फेरविचार करण्यात येत आहे, तोपर्यंत प्रलंबित आणि भविष्यात दाखल होणाऱ्या प्रकरणांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. राजद्रोह कायद्यावर फेरविचार करेपर्यंत नागरिकांच्या हितांचे रक्षण कसे करणार? असा प्रश्नही कोर्टाने केंद्राला विचारला.

राजद्रोह कायद्यावर पुन्हा विचार करत आहोत. ही सुनावणी टळावी, अशी विनंती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कोर्टाला केली. त्याला याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी विरोध केला. सरकार केवळ फेरविचार करत आहे म्हणून सुप्रीम कोर्टाची कार्यवाही थांबवली जाऊ शकत नाही, याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधलं. दरम्यान, सरकारने बाजू मांडल्यानंतर, आम्ही बजावलेली नोटीस कैक महिन्यांआधीची आहे. पुनर्विचार करण्याची आवश्यकता नाही, असं तुम्ही आधी सांगितलं आणि आता तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. तुम्ही नेमका किती वेळ घ्याल? अशी विचारणा सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी सरकारला केली. जोपर्यंत तुम्ही कायद्यावर फेरविचार करत आहात, तोपर्यंत या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू नका, असे आदेश राज्यांना का देत नाही, अशी विचारणाही कोर्टाने केंद्राला केली. जोपर्यंत यावर फेरविचार होत आहे, तोपर्यंत या कायद्याला स्थगिती द्यावी असे राज्यांना का सांगत नाही, असेही कोर्टाने विचारले. केदारनाथ निकालानं कायद्याला कमकुवत केले आहे. मात्र तरीही स्थानिक पातळीवर पोलीस कायद्याचा वापर करत आहेत, असेही कोर्टाने निदर्शनास आणून दिले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT