Priyanka Gandhi; पोलीसांचा प्रोटोकॉल तोडून लखीमपुर मध्ये रवाना Saam Tv
देश विदेश

Priyanka Gandhi; पोलीसांचा प्रोटोकॉल तोडून लखीमपुर मध्ये रवाना

लखीमपुर खीरीत या ठिकाणी ८ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : लखीमपुर खीरीत या ठिकाणी ८ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. रविवारी रात्री प्रियंका गांधी लखनऊ मध्ये पोहोचले. यानंतर शेतकऱ्यांना भेटण्याकरिता त्या लखीमपुरमध्ये गेल्या असताना त्यांना पोलिसांनी अडवणूक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीटिंग घेऊन आदेश दिले की, विरोधी पक्षामधील कोणताही नेता लखीमपुर- खीरी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना अटक करण्यात यावी या आदेशानंतर राजकीय नेत्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

प्रियंका गांधी म्हणाल्या की, खूप महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहे. तरी देखील सरकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. सुरवातीपासून शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेला आहे. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांना संपून टाकण्याकरिता आणि त्यांचा आवाज दाबण्याच राजकारण करत आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. हा देश भाजपच्या विचारधारेवर चालणारा देश नाही.

या देशाला शेतकऱ्यांनी बनवल आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाले की जेव्हा सरकार आणि पोलीस शक्तीचा वापर करत असते तेव्हा त्यांची नैतिकता संपली असते. मी माझ्या घरामधून बाहेर पडून कोणताही अपराध करणार नाही. मी फक्त मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याकरिता जात आहे. लखीमपुर मध्ये झालेल्या हिंसाचारात बाबत बोलताना ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकार या घटनेच्या मुळापर्यंत जाणार आहे. त्यांनी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

SCROLL FOR NEXT