Cheetah In India
Cheetah In India Saam Tv
देश विदेश

Cheetah In India: 'त्या' ८ चित्त्यांचं नामकरणं झालं; PM मोदींनी ठेवलं खास नाव!

वृत्तसंस्था

Cheetah In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेले आठ चित्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. या 8 चित्तांमध्ये 5 मादी आणि तीन नर चित्ते आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या चित्त्यांना (Cheetah कुनो अभयारण्यात सोडलं आलं.

त्यानंतर आता या आठही चित्त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी यातल्या मादी चित्त्याचं नामकरण केलं. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबियाहून चित्ते आणण्यात आले आहेत.

ओबान, फ्रेडी, एल्टन, सावन्नाह, आशा, सिबली, सैसा आणि साशा अशी या आठ चित्त्यांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एका मादी मादी चित्त्याचं नाव ठेवलं आहे. या मादी चित्त्याचं नाव आशा असे ठेवण्यात आलं आहे. तर, इतर चित्त्यांची नावे नामिबियामध्ये ठेवण्यात आली होती. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबियाहून चित्ते आणण्यात आले आहेत.

कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे. तसेच या चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT