indonesia flood  Saam tv
देश विदेश

Flood : पुराचा हाहाकार! 950 हून अधिक लोकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता, कोणत्या शहरावर देव कोपला?

Indonesia flood : इंडोनेशियामध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पुरात 950 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची हाती आली आहे.

Vishal Gangurde

इंडोनेशियातून पुराचे धडकी भरवणारे फोटो व्हायरल

पुरात ९५० हून अधिक लोकांचा मृत्यू

झाडांच्या फांद्या उचलण्यासाठी घेताहेत हत्तीची मदत

इंडोनेशियाच्या अचे प्रांतातून धडकी भरवणारी दृश्य समोर आले आहेत. जंगलातील झाडे तोडल्यानंतर आलेल्या पुराने शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पाहायला मिळत आहेत. या झाडांच्या फांद्या उचलण्यासाठी हत्तींची मदत घेतली जात आहे.

इंडोनेशियाच्या अचे प्रांतातील पीडिए जया जिल्ह्यातील मेरेउदू शहराला पूराचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमात्रा बेटावर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुरामुळे आतापर्यंत ९५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेच्या मतानुसार अचे, उत्तर सुमात्रा, पश्चिम सुमात्रा प्रांतात अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे ९५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशियामधील एकूण पुरात २७४ लोक बेपत्ता झाले आहेत. तर बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पाण्यामुळे जिल्ह्यातील हजारो गावे आणि शहरे पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे पीडीए जया, मध्य अचे, बेनेर मेरिया आणि अचे प्रांतातील जिल्ह्यात दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. पुरामुळे नदीवरील पूल वाहून गेले आहेत. तर वीज आणि पाणीपुरवठा देखील खंडीत झाला आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, अंदाजे ३२ लाख लोकांना फटका बसला आहे. या पुरातून आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

पूरग्रस्त भागात अन्न, निवारा आणि औषधांची तीव्र टंचाई देखील झाल्याची माहिती हाती आली आहे. अचे शहरात पिण्याचे पाणी आणि पंपावर इंधनासाठी लांब रांगा लागत आहेत. बाजाराता गरजेच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुरामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना डॉक्टरही अपुरे पडत आहेत.

बाजारात तांदूळ, भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपत चालला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तिप्पट झाल्या आहेत. सात दिवसांत पुरवठा साखळी पूर्ववत केली नाही, तर दुष्काळ पडण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे सरकारने मदत म्हणून ३४,००० टन तांदूळ आणि ६८ लाख लिटर स्वयंपाकासाठी तेल पाठवलं आहे. परंतु गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. अनेक भागात इंटरनेट नेटवर्क देखील बंद झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Mangalsutra Design: रश्मिका मंदानाच्या मंगळसूत्राचा नवा ट्रेंड, नाजूक आणि स्टायलिश डिझाईन्स पाहाच

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी पूर्ण; कोर्टाकडे रवाना

Nandurbar : मोठी बातमी! तेलाचा डब्बा ३०० रुपयांनी महागला; जाणून घ्या आताचे दर

UPI payments: आता पिन न टाकताही होणार UPI पेमेंट; आलं नवं फिचर

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण! तब्बल ३३ हजारांनी झालं स्वस्त; वाचा खरेदीची हीच योग्य वेळ आहे का?

SCROLL FOR NEXT