Indo China Conflict x
देश विदेश

India China Tension : पाकिस्ताननंतर आता चीनच्या कुरापती, चीनविरोधात भारताने केली मोठी कारवाई

Indo China Conflict : अरुणाचल प्रदेशात चीननं कुरापत केली आणि भारतानं चीनची खोड मोडलीय.. भारतानं चीनला मोठा दणका दिलाय....मात्र चीननं कशी कुरापत काढलीय आणि भारतानं चीनची कशी नाकेबंदी केली. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

भारत-पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीनने आधीच भारताला डिवचलेलं. त्यातच भर घालत चीननं 'एक्स'वर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय. तिथल्या ठिकाणांची नावही चीनने परस्पर बदलली आहेत. चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलयं.

भारताचा ड्रॅगनला इशारा

- अरुणाचल प्रदेशातली नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद

- अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील

- चीनने केलेल्या नामकरणाने हे सत्य बदलणार नाही

- आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो

दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या एक्स अकाऊंटवर बंदी घातलीय. याच एक्स अकाऊंटच्या मार्फत चीनी प्रपोगंडा पसरवण्याचं काम सुरु होतं. 1963 च्या चीन-पाकिस्तान करारानंतर चीन हा नेहमीच पाकिस्तानच्या पाठिशी उभा राहिलाय. चीन पाकिस्तानला आर्थिक, तंत्रज्ञानांचीच नव्हे तर लष्करासह, शस्त्रांस्त्रांची मदत देत आला आहे. त्यामुळे चीनचा दुतोंडीपणा भारताला चांगलाच ठाऊक आहे. ज्यामुळे पाकनंतर चीनची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं कंबर कसलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT