India Alliance Latest News Saamtv
देश विदेश

India Alliance News: इंडिया आघाडीत जागावाटप आणि उमेदवार कधी होणार निश्चित? लालूंनी सांगितली तारीख, दिल्लीत होणार बैठक

India Alliance Latest News: इंडिया आघाडीत जागावाटप आणि उमेदवार कधी होणार निश्चित? लालूंनी सांगितली तारीख, दिल्लीत होणार बैठक

Satish Kengar

India Alliance Latest News:

इंडिया आघाडीत आता जागावाटप आणि उमेदवारांची निवड होणार आहे. याची प्रक्रिया 12 आणि 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी झारखंडमधील देवघर येथील बाबा बैद्यनाथ धाम मंदिरात प्रार्थना केल्यानंतर लालूंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारत आघाडी लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आता उमेदवार निवडीचे काम सुरू केले जाणार आहे.

ते म्हणाले की, 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या निमंत्रकांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी समन्वय समितीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला लालूंचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित राहणार आहेत.

यावेळी लालूंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, त्यांनी बाबा बैद्यनाथ यांच्याकडे इतके संख्याबळ मागितले की ते एनडीएला सत्तेतून बेदखल करू शकतील. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान मोदींनी जनतेला फसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु नरेंद्र मोदींचा बजरंगबलीचा नारा कर्नाटकात चालला नाही. देशात महागाई, गरिबी आणि बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. केंद्र सरकारला बाबासाहेबांचे संविधान विकायचे आहे, असा आरोप लालूंनी केला.

भाजप हा भांडवलदारांचा पक्ष असल्याचे म्हणत लालूप्रसाद यादव म्हणाले की, भाजप देशाचे विभाजन करून लोकांमध्ये मतभेद निर्माण करत आहे. आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेवरून हटवण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

SCROLL FOR NEXT