Winter Session: अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्द Saam Tv
देश विदेश

Winter Session: अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्द

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सूरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गदारोळाने सुरु

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सूरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गदारोळाने सुरु झाली. त्यानंतर सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज १२ पर्यंत स्थगित केले आहे. विरोधकांनी गदारोळ सूरू करताच सभापतींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रतिष्ठेचा मान ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी देखील विरोधक शांत होत नसल्याचे पाहता त्यांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय हाती घेतला आहे.

हे देखील पहा-

गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शेतकरी जे एक वर्ष लढले, लाठी मार खाल्ला,खलिस्तानी दहशतवादी आरोप झाला. मोठा संदेश गेला देश एकत्र आला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो,असे सांगत मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषण केली,

हे कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे केंद्र सरकार नमले व आजपासून हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदी यांनी केली.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT