Marriage  Saam TV
देश विदेश

नवरदेव दारुच्या नशेत दिसताच नवरी संतापली; भर मंडपात सिनेस्टाईल हाणामारी

Wedding Cancel : वरातीत वऱ्हाडी मंडळींसह वरानेही अक्षरश: दारू ढोसली होती

साम टिव्ही ब्युरो

मधुबनी : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून एक धक्कादायक पण धाडसी घटना समोर आली आहे. येथील एका वधूने दारूच्या नशेत आलेल्या वराशी लग्न करण्यास नकार दिला. वधूच्या निर्णयामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तिच्यावर लग्नासाठी दबाव देखील टाकण्यात आला. मात्र कुठल्याही दबावाला न जुमानता आणि न घाबरता ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. सरतेशेवटी वराला आणि वऱ्हाडी मंडळीला आल्या पावलीच माघारी परतावे लागले.

वधुने अचानक उचललेल्या या पावलाचं संपूर्ण मधुबनी जिल्ह्यात कौतुक होत आहे. बिहारमध्ये सध्या दारूबंदी कायदा लागू आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचं मद्यपान करण्यास मनाई आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संपूर्ण राज्य दारूमुक्त करायचं आहे. अशातच या धाडसी लोकांमुळे बिहार दारूमुक्त होऊ शकतं अशी चर्चा आता सर्वत्र जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुबनी जिल्ह्यातील काजल कुमारी नामक तरुणीचं लग्न नेपाळमधील भदरिया गावातील रहिवासी राजू सदा याच्याशी होणार होतं. लग्नासाठी भव्य मंडपही देण्यात आला होता. तसेच वऱ्हाडी मंडळीसाठी जेवणाची सोयही करण्यात आली होती. ठरलेल्या वेळेत वऱ्हाडी मंडळी गावात सुद्धा आली होती. मात्र लग्नमंडपात जाण्यापूर्वी वराकडील मंडळींनी वरात काढली. या वरातीत वऱ्हाडी मंडळींसह वरानेही अक्षरश: दारू ढोसली. जेव्हा ही वरात लग्नमंडपात आली तेव्हा वधूने मात्र नवरदेव नशेत असल्याचं पाहून लग्नास नकार दिला.

अचानक लग्नास नकार दिल्याने लग्नमंडपात गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. नवरीमुलीचा हट्ट बघून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. आणि क्षणार्धात या गोंधळाचं रुपांतर हाणामारीत झालं. वधूकडील मंडळींनी वरासह वऱ्हाडी मंडळींना चोप देत माघारी पाठवलं. वधूकडील मंडळीचं म्हणणं आहे की, वराकडील 100 पेक्षा अधिक लोकं दारूच्या नशेद धुंद होते.

बिहारमध्ये दारूबंदी कायद्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. असे असतानाही दारूबंदी कायद्याची टिंगलटवाळी होत असल्याच्या बातम्या रोज येत असतात, अशा स्थितीत बसोपट्टीच्या या धाडसी वधूने ज्या प्रकारे दारू पिऊन वऱ्हाडी मंडळींना परत करण्याचे धाडस दाखवले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT