देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होत नाही तोच भाजप कामाला लागली आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी बड्या नेत्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. येथे विजयाची पतका फडकावण्यासाठी भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी त्यांना भाजपनं प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद तावडे यांच्या खांद्यावर केरळमध्ये पहिला विजय मिळविण्याचे आव्हान असणार आहे. केरळमध्ये भाजपला एकदाही विधानसभेत बहुमत मिळालेले नाहीये.
केरळमध्ये सध्या भाजपचा एकही आमदार नसल्याने तावडे यांना थेट शुन्यापासून सुरूवात करावी लागणार आहे. तावडे यांच्यासाठी हे शिवधनुष्य ठरणार आहे. केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच तावडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत कार्यकर्त्यांना भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'विकसित भारत विकसित केरळम' हा संदेश प्रत्येक घरात पोहोचविण्याचे तसेच विकास आणि समावेशक प्रशासनाच्या चळवळीला बळकटी देण्याचे आवाहन तावडे यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.