Anti Sikh Riots Case  saam tv
देश विदेश

Anti Sikh Riots Case: १९८४ च्या दंगली प्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; बाप-लेकाला जाळून मारलं, ४१ वर्षानंतर निकाल

Anti Sikh Riots Case: जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची सरस्वती विहारमध्ये १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमारला आरोपी करण्यात आले होते.

Bharat Jadhav

1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. कुमार यांच्या शिक्षेवर18 फेब्रुवारीला वाद-विवाद होणार आहे. एक नोव्हेंबर 1984 दिल्लीच्या सरस्वती विहारमध्ये जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार आरोपी होते. या प्रकरणात कोर्टाने आज निर्णय दिला.

काय आहे आरोप?

कोर्टाने आरोपी सज्जन कुमार यांच्याविरोधात IPC कलमान्वये 147/148/149/302/308/323/395/397/427/436/440 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेत. एसआयटीने सज्जन कुमार हे संतप्त जमावाचं नेतृत्त्व करत होते. त्यांना प्रेरित केल्यामुळे टोळक्याने दोन व्यक्तींना जिवंत पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या घरातील वस्तू आणि संपत्तीचं नुकसान केलं होतं. घरातील वस्तूंची नासधूस केली.

संतप्त जमावाने पीडित लोकांचं घर पेटवून दिलं होतं. तसेच त्यांच्या घराच्यांनाही मारहाण केली होती. एक नोव्हेंबर 2023 रोजी कोर्टाने या प्रकरणी सज्जन कुमार यांचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी सज्जन कुमार यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT