शामल भंडारे, साम टीव्ही
एआयमुळे दिवसेंदिवस नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळतीय. सर्वात मोठं संकट हे आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांवर निर्माण झालंय. यात आता आणखी एक कंपनीची भर पडलीय. आणि ती आहे भारतातल्या सर्वात मोठ्या कंपनींपैकी एक असलेली TCS....TCSचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी तसे थेट संकेतच दिले आहेत. टीसीएसमध्ये कर्मचाऱ्यांच्या संखेच्या बरोबरीनं AI एजंटांमार्फत काम करण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे कंपनीला पूर्वीएवढ्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार नसल्याचं चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलंय.
हे कमी होतं की काय त्यात भर पडलीय ती मॅनपॉवर ग्रुपच्या ताज्या अहवालाची. मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणानुसार आता पुढच्या तीन महिन्यात कर्चमारी भरतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे...... या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या तर एकच चित्र समोर येतंय—ते म्हणजे, कंपन्यांनी आता नोकरभरतीला मोठा ब्रेक लावला आहे. या सगळ्यामागची कारणं काय आहेत, पाहूयात-
जागतिक आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे कंपन्यांची सावध भूमिका
जुलै ते सप्टेंबर तिमाहीत नोकरभरतीचा वेग मंदावणार
AI तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाच्या गरजांमध्ये बदल
सुरुवातीच्या पातळीवरील नोकऱ्यांची मागणी घटली
जागतिक पातळीवरील भू-राजकीय अस्थिरता आणि तंत्रज्ञानातले वेगवान बदल या दुहेरी कात्रीत तरुण अडकले आहेत. त्यामुळे नव तरुणांसाठी हा काळ संयमाचा आणि स्वतःची कौशल्ये अधिक अद्ययावत करण्याचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.