Thane Political News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Political News: ठाण्यात काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येणार? 1990 चं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी काय आहे रणनीती

Satish Kengar

>> विनय म्हात्रे

Thane Political News:

ठाणे जिल्हा काबीज करण्यासाठी ठाकरे, शिंदे आणि भाजप आक्रमक होताना दिसतायत. मात्र 1990 दशकात ठाण्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसने ही आता कंबर कसलीय. गेल्या दोन दशकात कधी नव्हे ती ऊर्जा कालच्या नवी मुंबईतील युवकांच्या मेळाव्यातून दिसली.

ठाणे जिल्हा सध्या राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर राजकारणाच्या दृष्टीने अग्रेसर आहे. याच जिल्ह्यातील विकसित शहर म्हणून नवी मुंबई शहराकडे पहिलं जातं.

पण एकेकाळी ठाणे जिल्ह्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेस नवी मुंबईत मात्र अंतर्गत वाद विवादात, इतर पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना मोठं करण्यातच व्यस्त राहिली. कालच्या नवी मुंबईतील युवक काँग्रेसच्या परिवर्तन सभेत युवकांची गर्दी पाहता विरोधकांची झोप उडल्याची चर्चा सभेत होती. (Latest Marathi News)

ठाण्यात काँग्रेवीसची ताकद काय होती?

जनार्दन गौरी, शांताराम घोलप, नकुल पाटील, कांती कोळी यांनी ठाण्यावर अधिराज्य गाजवलं.

- 1990 मध्ये जनार्दन गौरी आणि नकुल पाटील यांना काँग्रेसने तिकीत नाकारली.

- तिकीट नाकारल्याने आगरी कोळी समाज नाराज झालं.

- याचाच फायदा आनंद दिघे यांनी घेत ठाण्यावर आपली पकड मजबूत केली.

ठाणे जिल्ह्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या गणेश नाईकांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मुलगा संदीप नाईकांना आव्हान काँग्रेसने तयार केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, मागील दोन दशकात ठाणे जिल्ह्यातील राजकारणात मागे पडलेली काँग्रेस पुन्हा एकदा नवी मुंबईच्या माध्यमातून उभारी घेण्याचं प्रयत्न करतेय. या प्रत्यंनांना किती यश येतंय हे येत्या 2024 च्या निवाडणुकांनंतर लक्षात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT