Raju Patil  Saam Tv
मुंबई/पुणे

MNS News: मनसे महायुतीत सहभागी होणार का? शर्मिला ठाकरे यांचं नाव घेत राजू पाटील म्हणाले...

Raju Patil News: नऊ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार या प्रश्नावर राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख, कल्याण

Raju Patil On Raj Thackeray:

''राज ठाकरे काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी देखील सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय सांगणार, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. मनसे महायुतीत सहभागी होणार का? नऊ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांना जे काही बोलायचं ते नऊ तारखेला बोलतील आणि ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचं बोलतील असा विश्वास व्यक्त केला. आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना मदत करणार नाही, असे सांगत नाव न घेता ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना त्यांनी लक्ष केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नऊ तारखेला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मनसेकडून भव्य बाईक रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात आज उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ कल्याण ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. (Latest Marathi News)

याचदरम्यान बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या आदेश काय आहेत, त्यासाठी सगळेच तयार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. 2019 मध्ये राज ठाकरेंनी 30 दिवसआधी विधानसभा लढवण्यास सांगितले होते. मी स्वतः लोकसभा 2014 ला लढलो. त्यामुळे इथली लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी करायची, हे सगळं आम्हाला माहिती आहे. यावेळेस पण आदेश दिला तर तयार आहोत, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT