Mumbai Crime Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : भयंकर! ७ जणांची हत्या, दोघांचा मृतदेह नाल्यात फेकला; आरोपीच्या दाव्याने पोलिसांची उडाली झोप

Mumbai Crime News : मुंबईच्या वडाळ्यातील आरोपीने ७ जणांची हत्या केल्याचा दावा केला आहे. तसेच त्याने हत्या केल्यानंतर दोघांचा मृतदेह नाल्यात फेकल्याचा दावा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतील वडाळ्यात १२ वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलीस चौकशीत आरोपीने खळबळजनक दावा केला आहे. आरोपीने १२ वर्षीय मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीने ७ जणांचा हत्या केल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या दाव्यानंतर पोलिसांची झोप उडाली आहे.

वडाळ्यात १२ वर्षीय मुलाच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने आणखी सात जणांची हत्या केल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. कोव्हिड काळात पॅरोलवर बाहेर आल्यानंतर बिपुल शिकारीने मुंबईत साथीदार राजू मंडल आणि दुसऱ्या एका १२ वर्षीय मुलाच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपी बिपुलने दोघांचे मृतदेह भक्ती पार्क येथील नाल्यात फेकल्याचा शिकारीने केला आहे. शिकारीने दावा केल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह शोधण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे प्रकरण?

पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपी बिपुलने २८ जानेवारीला वडाळ्यातील १२ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बिपुलला ताब्यात घेतलं होतं. पुढे बिपुलने पोलिसांच्या हाताला तुरी देत पळ काढला होता. आरोपी बिपुल आठ महिने पोलिसांना गुंगारा देत होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी बिपुलला दिल्लीवरून अटक केली आहे.

दरम्यान, बिपुलने २०१२ साली कोलकाता येथे स्वतःच्या पत्नी आणि २ वर्षीय सावत्र मुलीची हत्या केली होती. याच पत्नीच्या हत्येप्रकरणी बिपुल जन्मठेपाची शिक्षा भोगत होता. पुढे कोव्हिड काळात पॅरोलवर बाहेर येताच बिपुल फरार झाला होता. आता आरोपीने मुंबईत दोघांच्या हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने हत्या केल्यानंतर मृतदेह नाल्यात फेकल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT