लोणावळ्यात फिरायला आलेल्या दोन तरुणांचा खाणीत बुडून मृत्यू  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

लोणावळ्यात फिरायला आलेल्या दोन तरुणांचा खाणीत बुडून मृत्यू

बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाचा आज जन्मदिवस होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

लोणावळा : लोणावळ्यात फिरायला आलेल्या तरुणांपैकी दोन जणांचा आज खाणीत पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. निगडी रुपीनगर भागातील हे तरुण आहेत. आकाश गुरव व वीरेंद्र त्रिपाठी अशी या खाणीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव याचा आज वाढदिवस होता. Two youths drowned in a mine while swimming in Lonavla

वाढदिवस साजरा करण्यासाठी करण्यासाठी आकाश आणि त्याचे इतर चार मित्र त्यांच्या तीन मोटरसायकलवरून लोणावळ्यात आले होते. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ते सर्व लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज समोर असलेल्या एका दगडाच्या खाणी कडे गेले होते. त्याठिकाणी गेल्यावर आकाश सोबत आलेले त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.

यावेळी आकाश आणि विरेंद्रही पोहण्यासाठी उतरला होता. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना खोल पाण्यात उतरू नका असे सांगूनही त्यांनी त्यांचे ऐकले नाही. आणि ते खोल पाण्यात गेले असता पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. युवकांनी अतिउत्साहीपणा दाखवून अश्या पद्धतीने मृत्यू ओढावून घेणे दुर्दैवी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

SCROLL FOR NEXT