MVA Goverment Saam TV
मुंबई/पुणे

आमदारांची नाराजी नको म्हणून राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांदरम्यान, सरकारला आमदारांची नाराजी ओढवून घ्यायची नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील प्रशासकीय बदल्यांबाबत काढलेला निर्णय मागे घेतला आहे. या प्रशासकीय बदल्या आता ३० जूनपर्यंत स्थगित केल्या आहेत. राज्यातील प्रशासकीय बदल्या मे महिन्यात करा, असा आदेश सरकारने मागील आठवड्यात काढला होता. पण, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या एक महिना पुढे ढकलण्याचा राजकीय निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

हे देखील पाहा -

सरकारला राज्यातील आमदारांची नाराजी ओढावून घ्यायची नसल्यामुळे या बदल्या पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे. कारण, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असून, या दोन्ही निवडणुकांमध्ये आमदारांच्या मतांना महत्व असतं शिवाय आमदारांना आपआपल्या मतदार संघात, जिल्ह्यांमध्ये अपेक्षित बदल्या हव्या असतात, त्यासाठी त्यांनी निवेदनं देखील दिलेली असतात. मात्र, या बदल्यांमध्ये सरसकट सर्वांना खुश करणे शक्य नसल्यामुळे सरकारने सावध भूमीका घेत हा धोरणात्मक निर्णय घेत या बदल्या आता ३० जून पर्यंत करु नये असा निर्णय घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

भंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात निष्पापांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT