देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवे
देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवे Saam Tv
मुंबई/पुणे

देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये - रावसाहेब दानवे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - राज्यातील वीज उत्पादन संकटास केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक कोळसा साठवणूकीचे नियोजन करण्याचे कळवले असताना  राज्य सरकारने कोळशाची साठवणूक केली नाही आणि आता केंद्र सरकारवर ठपका ठेवत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वीज उत्पादन संकटास केंद्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याच्या संदर्भातील आरोपासंदर्भात रावसाहेब दानवे यांनी आपले मत मांडले.

पुढे रावसाहेब दानवे म्हणले की, महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्याही कारणासाठी केंद्र सरकारवर आरोप करत सुटलेले असते मग ते करोना असो,अतिवृष्टी असो,शेतकऱ्यांचे नुकसान झाले, मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण काही झाले की केंद्र सरकार जवाबदार असे बोलण्याचा त्यांना हा एकमेव छंद लागलेला आहे. देशातील सर्व राज्य सरकारकडून कोळशाची मागणी होते त्यानुसार पुरवठा करण्यात येतो आज आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना त्यांचे म्हणणे आहे की कोळसा नाही.

हे देखील पहा -

देशात चाळीस लाख मेट्रिक टन कोळसा भांडारात उपलब्ध आहे कोळसा खाण केंद्रवर सात लाख मेट्रिक टन कोळसा अतिरिक्त साठवलेला आहे.  भयंकर पाऊस झाल्यानंतर सुध्दा आमच्या अधिकाऱ्यांनी व कामगारांनी रात्रंदिवस अतिशय जोखीम घेऊन सातत्याने मेहनतीने प्रयत्न करत काम करून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कोळशाचे उत्पादन केले आहे असे देखील दानवे म्हणाले.

महाराष्ट्र राज्याला, कोल इंडिया ने अनेक पत्र लिहून त्यांचा कोळश्याचा हिस्सा त्यांनी उचलावा असे वारंवार सांगितले होते. मात्र महाजनकोने त्या पत्राची दखल न घेता कोणत्याही प्रकारचे शेड्युल कोल इंडिया कडे पाठवले नाही .कोळशाचे योग्य नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली आहे असा देखील आरोप दानवे यांनी यावेळी केला आहे.

पुढे दानवे म्हणाले की, परदेशातून वीस टक्के कोळसा आपल्या देशात येतो तो महाग झाला आहे. मात्र त्यापेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन आपण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत आपले उत्पादन वाढले आहे. भारतात पर्याप्त कोळसा उपलब्ध आहे. चिंता करण्याचे काही कारण नाही राज्य सरकारचे नियोजन फसले त्यांनी पावसाच्या पूर्वी आवश्यक साठा केलेला नाह.

महाराष्ट्र बंद हा राज्य सरकारचा बंद होता,पोलीस लोकांना मारत होते दुकाने पोलिसांनी बंद केली हा जनतेचा बंद नव्हता सरकारचा बंद होता. मानव अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. बलात्काराच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही शेतकऱ्यांना दिलासा नाही ज्याकडे लक्ष द्यायचे तिकडे यांचे लक्ष नाही आणि उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाताची हे कॉपी करत बसलेत हे कॉपी सरकार आहे असे देखील रावसाहेब दानवे यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT