Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेत खदखद सुरू झाली? राजकीय विश्लेषकांनी सांगितली नेमकी कारणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बंडाची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे यांनी ट्विट करून शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांची पक्ष प्रतोदपदी निवड केल्याची माहिती दिली. शिंदे यांच्या या कृतीने थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याचं मानलं जात आहे. अशात आता ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त झाला का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे शिवसेनेत फुट पडल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावून समर्थक आमदारांसह थेट गुजरातमधील सूरत गाठले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार परत येतील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्नही झाला. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींवरून तरी लक्षात येत आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी संविधानिक पद स्वीकारले नाही

'शिवसेना नेत्यांमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे हा मेसेज गेला, त्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज होते. तसेच संजय राऊत यांचाही हत्यक्षेप झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी रिमोट कंट्रोल फक्त आपल्याकडे ठेवला होता. त्यांनी कोणतही संविधानीक पद स्वीकारले नाही, पण आता तसे झालेले नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत: मुख्यमंत्रीपद ठेवले. त्यामुळेच शिवसेनेतील नेते नाराज झाले, अस मत राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केलं.

रश्मी ठाकरे यांनी राजकारणात एंट्री घेतली आणि शिवसेनेच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. रश्मी ठाकरे यांचा जनसंपर्क नाही, पण राजकारणातील हस्तक्षेप वाढत होता. रश्मी ठाकरे यांचा याअगोदर कधीच राजकारणाशी संबंध नाही, पण आताच संपर्क वाढला आहे. याचाही फटका शिवसेनेला (Shivsena) बसला असल्याचेही राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर म्हणाले.

शिवसेनेवर ही वेळ का आली?

राज्यसभा निवडणुकीपासूनच या शक्यतेची कुणकुण लागली होती. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जास्त कोटा द्यायचा, शरद पवार यांनी रणनीती ठरवली होती. पण या रणनीतीला सेनेतील नेत्यांनी विरोध केला. परिणामी संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. उद्धव ठाकरे साधे नेते आहेत, त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा फार अनुभव नाही. शरद पवार यांनी जर बंडखोरीचा निरोप पाठवला होता, तर ठाकरेंनी सावध राहायला हवे होते, पण तसे झाले नाही, हे गंभीर आहे. या संदर्भात आता खरे सत्य बाहेर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हातून ही चूक कधीच झाली नसती, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Lok Sabha Voting: पैसे देऊन मतं विकत घेतली? रोहित पवारांनी शेअर केलेल्या आणखी Video ने खळबळ, काटेवाडीत काय घडलं?

Gautam Buddha Thoughts: सुखी जीवनासाठी फॉलो करा गौतम बुद्धांचे अनमोल विचार; दु:ख आणि चिंता कायमची मिटेल

Ankita Lokhande Trolled : ‘स्वत:ला माधुरी दीक्षित नको समजू...’, धकधक गर्लच्या लूकमध्ये आली अंकिता लोखंडे, नेटकऱ्यांनी सुनावलं

Astro Tips: घरात सुखशांती नांदवण्यासाठी हळदीचा करा 'या' पद्धतीनं वापर

Sambhajinagar Corporation : प्रारूप विकास आराखड्यावर ८ हजार ५०० आक्षेप; सुनावणीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती

SCROLL FOR NEXT