shinde Government news  saam tv
मुंबई/पुणे

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या 'या' कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह सहाय्य मिळणार; सरकारची मान्यता

४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्य शासनाने मान्यता दिली होती. या निर्णयात बदल करत स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सामावेश करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

shinde Government news : राज्यातील 'अ' आणि 'ब' महानगरपालिका वगळता 'क' आणि 'ड' महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्रातील कोविड विरोधी मोहिमेत कर्तव्य पाडताना कोरोनाने (Corona) लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य /लवमा कवच लागू करण्यात आला होता.

सदर निर्णयाला ४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्य शासनाने मान्यता दिली होती. या निर्णयात राज्य मंत्रिमंडळाने बदल करत स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सामावेश करण्यात आला आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी/कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

स्थानिक स्वराज संस्थामधील सफाई कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी , मानधन तत्वावरील कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना सदर निर्णयातील कर्मचाऱ्यांमध्ये सामावेश करण्यात आला आहे.

या योजना राज्यातील 'अ' आणि 'ब' महानगरपालिका वगळता 'क' आणि 'ड' महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद / नगरपंचायती यांना लागू करण्यासाठी वित्त विभागाने तरतूद उपलब्ध केली आहे. वित्त विभागाकडून ३९.५० कोटी हे २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे वितरीत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT