Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: संजय राऊत यांचा हक्कभंग समितीवर आक्षेप; थेट विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र, वाचा

संजय राऊत यांनी याच हक्कभंग समितीवर आक्षेप घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Mumbai News: राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. राऊत यांनी हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर दिलं होतं. त्यानंतर राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल केल्यानंतर समिती देखील स्थापन केली होती. मात्र, संजय राऊत यांनी याच हक्कभंग समितीवर आक्षेप घेतला आहे. यावरून राऊत यांनी थेट विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांचे पत्र जसेच्या तसं

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रात लिहिलंय की, 'सन्मानिय विधानसभा सदस्य अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी माझ्याविरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार तसेच अवमानाच्या सूचनेवर उत्तर देण्यासाठी आपण मुदत वाढवून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे'.

मी माझी भूमिका अत्यंत थोडक्यात स्पष्ट करतो...

१) महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त, बेकायदेशीर व संपूर्णतः घटनाबाह्य सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे. सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

२) माझ्या असे निदर्शनास आले की, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले असून तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते.

संसदीय लोकशाही परंपरेस धरून नाही.

३) विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीरी माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्यास हरकत नाही. पण माझे विधान नेमके काय होते ते पहा.

आम्हाला सर्व पदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी दिली. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हा विधिमंडळनसून चोरमंडळ आहे." असे माझे विधान १ मार्चच्या कोल्हापुरातील सर्वच वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाले म्हणजेच मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे.

या चोरमंडळातील सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यापैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते.

विधिमंडळाचे हसे होऊ नये म्हणूनच मी हे परखड सत्य मांडले. बाकी विधिमंडळात कोणत्याही चोरमंडळास स्थान असू नये हे लोकशाहीचे संकेत व परंपरा आहे. मी त्या परंपरेचे पालन करणारा एक नागरिक आहे'.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रानंतर विधिमंडळाकडून काय उत्तर येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुमारे 11 हजार दिव्यांची रोषणाई करत प्रकाशा येथे संगमेश्वर महाआरती...हजारो भाविकांची उपस्थिती.

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

Swabhimani Shetkari Sanghatna : दिवाळी सणात चटणी भाकर आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Mumbai Goa Highway: दिवाळीच्या गर्दीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; माणगाव, इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगा|VIDEO

SCROLL FOR NEXT