Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement Saam TV
मुंबई/पुणे

Sakal-Saam TV Survey: अजितदादांचा भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांची निवृत्ती? समर्थकांनी दिलं उत्तर...

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement: अजित पवार हे भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतला, अशाही उलट सुटल चर्चा सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sakal-Saam Survey on Sharad Pawar Retirement: राज्याच्या राजकारणात मंगळवारी मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानकपणे पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (Latest Marathi News)

या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात सध्या मोठ्या चर्चा, तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी ५ मे रोजी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल तो आपल्याला मान्य असेल असंही ते म्हणाले.

अजितदादांचा भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांची निवृत्ती?

शरद पवार (Sharad Pawar) यांनी अचानकपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. अजित पवार हे भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतला, अशाही उलट सुटल चर्चा सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर साम-सकाळ समुहाने सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. (Breaking Marathi News)

यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील महिला पुरुषांचा समावेश असून यात सर्व वयोगटातील समर्थकांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेवर 'सकाळ-साम'ने रिसर्च केला आहे. यामध्ये विचारण्यात आलेल्या 'अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी निर्णय घेतला आहे, असे वाटते का? या प्रश्नावर ४१ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर ३६.६ % लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तर २२.४% लोकांनी सांगता येणार नाही असे म्हटलं आहे.

त्याचबरोबर 'अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल, असे वाटते का?' या प्रश्नावर अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल याबद्दल ५९.६ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर २०% लोकांनी हो उत्तर दिले आहे. सांगता येत नाही असं नोंदवणारी लोकं २०.३% आहेत.

या रिसर्चच्या माध्यमातून समर्थकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, अजित पवार जातील यामुळे शरद पवार यांनी हा निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर अजित पवार हे जरी भाजपसोबत गेले तरी महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार नाही, असं जास्त समर्थकांना वाटतं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT