मुंबई/पुणे

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवादी राजकारणाला ऊत; राज ठाकरे

जातीपातीतला महाराष्ट्राचा विचार बाहेर येण गरजेचं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : '१९९९ आधीही देशात जातीपाती होत्या पण, १९९९ नंतर राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु झाल. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीतील द्वेष जास्त वाढला. संपूर्ण भारतात जातीपातीचं राजकारण सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीपातीचा द्वेष सुरू झाला' हे सर्व राजकीय पक्षांना माहीत आहे, पण फक्त बोललो मी, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. तसेच, मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आणि यशवतंराव चव्हाणही वाचलेत, असंही त्यांनी म्हटंल आहे.

हे देखील पहा-

पुणे मनसे मध्यवर्षी कार्यालयात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भुमिका स्पष्ट केली. ''देश स्वतंत्र होऊन ७४ वर्षे झाली, पण, आम्ही तुम्हाला रास्ते देऊ, पाणी देऊं वीज देऊ हेच गेल्या ७४ वर्षांपासून सुरु आहे. पण या ७४ वर्षात आपण वैचारिक दृष्ट्या प्रगत झालो का, आपण काय कमावलं, काय गमावलं, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच, जातीपातीतला महाराष्ट्राचा विचार बाहेर येण गरजेचं आहे, हा या व्यक्तव्यामागचा अर्थ आहे, असंही त्यांनी सांगितलं. पण आता शाळा कॉलेजातही जातीपाती तयार झाल्या आहेत.

माथी भडकवून, जातीपातीचं राजकारण का करत आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की, नाही हे त्यांनी स्पष्ट सागांव. आपल्याला वॉर्डनिहाय आरक्षण नको, यात फक्त स्त्री आणि पुरुषांचे आरक्षण असावे. नरेंद्र मोदी विकासाचा मुद्द्यावर पंतप्रधान पदी निवडून आले. जातीपातीच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर नाही. पण राज्यात जातीपातीचं राजकारण तयार करण्यात येत आहे. असा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

EPFO Update: बंद PF खात्याबाबत मोठी अपडेट! EPFO सुरु करणार नवी सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया...

SCROLL FOR NEXT