Raj Thackeray vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

अदानी समूहाला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गट शनिवारी १६ डिसेंबर रोजी विराट मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चातून अदानींसह राज्यातील सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आता जे कुणी मोर्चा काढत आहेत त्यांना आताच का जाग आली, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

धारावी पुनर्विकाससारखा मोठा प्रकल्प मुंबईत येत आहे. मात्र तो परस्पर अदानींना का दिला? इथून सुरुवात होते. अदानींकडे असं काय आहे की विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, इतर गोष्टीही तेच हाताळू शकतात. सगळं अदानींनाच का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एवढ्या मोठ्या प्रकल्पाला बाकी कंपन्यांचे टेंडर्स देखील मागवायला पाहिजे होते. धारावीमध्ये काय विकासकामं होणार आहेत, हे सगळ्यांना कळायला पाहिजे होतं. पण ते झालं नाही. मला प्रश्न एवढात आहे की, सगळ्यांना आज का जाग आली आहे.

अदानींचं नाव जाहीर होऊन जवळपास १० महिने उलटून गेले आहेत. सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

धारावी खूप मोठा भाग आहे. तिथे पुनर्विकास करताना काय काय होणार आहे. सगळ्याचं एक टाऊन प्लानिंग असतं, ते सांगितलं पाहिजे. आठ-दहा महिन्यांनंतर जे जागे झाले आहेत, त्यांनी विचारलं का तिथे काय होणार आहे. मोर्चाचा दबाव आणून फक्त सेटलमेंट करायची आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT