Pune Court Sentenced 3 Persons
Pune Court Sentenced 3 Persons Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Court Sentenced 3 Persons: पुणे न्यायालयाने तिघांना सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

Priya More

Pune News: पुण्यामध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने (Pune Court) तीन आरोपींना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या आरोपींना शिक्षा सुनावत प्रत्येकी 25 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली होती. हत्येनंतर या मुलीचा मृतदेह बॅगेत भरुन त्यांनी तळेगाव रेल्वे स्थानकावर टाकून दिला होता. या घटनेमुळे नालासोपारा हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. ईशान कुरेशी, संतोष जोगदर आणि राहुल बरई अशी आरोपीची नावे आहेत.

हे तिन्ही आरोपी या प्रकरणात शिक्षा भोगत होते. याप्रकरणावर नुकताच पुणे विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील यांनी या प्रकरणात फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

ईशान कुरेशी, संतोष जोगदर आणि राहुल बरई या तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अपहरणाचा कट रचल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा, सामूहिक बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप, हत्या केल्या प्रकरणात जन्मठेप आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या शिक्षेसोबत न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 25 हजारांचा दंड सुनावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT