ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले
ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले SaamTV
मुंबई/पुणे

ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावरती भेट घेतली. विधान परिषद निवडणूकीसंदर्भात (Legislative Council Elections) चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले. यावेळी पटोलेंनी त्यांनी अनेक मुद्दांवरती भाष्य केलं यावेळी त्यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या नागपूर दौऱ्याबद्दलही भाष्य केलं तसेच त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाबोबत मोठं विधानं केलं आहे.

हे देखील पहा -

ते म्हणाले 'ST कर्मचाऱ्यांच आंदोलन हे चिंतेचा विषय असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. पण तरी पुन्हा ST कर्मचारी (ST staff) मैदानात उतरले आहेत. तसेच भाजपची दुटप्पी भूमिका आहे. केंद्रात खासगीकरण झाले आहे त्याचे काय? ST कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप BJP राजकारण करत आहे. मात्र आमची देखील ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्या अशीच भूमिका असल्याचं वक्तव्यं पटोलेंनी केल्याने अनिल परबांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

त्यामुळे ST कर्मचाऱ्यांच्या संपावरून 'मविआ' (MVA) मध्ये नवीन वाद सुरु? होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता नाना पटोले यांनी आपलं मत समितीसमोर मांडावं असा सल्ला अनिल परबांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT