Mumbai News
Mumbai News  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : ३,००० हून अधिक कुटुंबांवर भीषण पाणी टंचाईचं संकट; ग्रामस्थांनी दिला नो वॉटर नो व्होटचा नारा

Sandeep Gawade

संजय गडदे

मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली खाडीपलिकडे असंलेल्या गोराई गावात गेल्या काही वर्षापासून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या गावात राहणाऱ्या ३,००० हून अधिक कुटुंबांना भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे गोराई गावातील शेकडो कुटुंबीयांनी राजकीय नेत्यांना गोराई गावात प्रचार करण्यापासून रोखण्याचा निर्धार केला आहे. तसंच मतदानावर बहिष्कार देखील टाकण्याची भूमिका घेतली आहे.

महापालिका आणि मुख्यमंत्र्यांकडे याविषयी तगादा लावूनही अध्याप पाणी प्रश्न सुटलेला नाही. गोराई गावाशेजारील मनोरी गावात पालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीतपणे होतो मात्र मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडण्या करण्यात आल्यामुळे मनोरीच्या पुढे असलेल्या गोराईला मात्र पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

यावर तोडगा म्हणून गावकरी टँकरचा सहारा घेत असून काही जण गावातील जुन्या विहिरीतील अशुद्ध पाणी वापरत आहेत. त्यामुळे गोराईकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत त्यांनी नो वॉटर नो व्होटचा नारा दिला आहे. या गावात मत मागण्यासाठी येणारा नेतांना पहिला पाणी द्या नंतर वोट घ्या असा नारा गोराई गावातला नागरिकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

SCROLL FOR NEXT