Mumbai Crime news Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धारावीत पत्नीला पेटवत पतीचीही आत्महत्या, दारुमुळे आयुष्य उद्ध्वस्त

Mumbai Crime News: धारावीच्या नाईकनगर अशोक गल्ली येथे ही घटना घडली आहे.

सूरज सावंत

Mumbai News: दारुमुळे अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरण आहे. मुंबईतील धारावीतही अशीच एक घटना समोर आली आहे. धारावीत दारुच्या नशेत पत्नीला पेटवत पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धारावीच्या नाईकनगर अशोक गल्ली येथे ही घटना घडली आहे.

या दुर्घटनेत अनिल धुरीया व पिया धुरीया या दोघा पती-पत्नींचा मृत्यू झाला आहे. धारावीत हे दोघं एकत्र राहत असून पती अनिल धुरीयाला दारूचे व्यसन होते. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अनिल दारू पिवून आल्याने त्याचे प्रियासोबत भांडण झाले. (Crime News)

वाद इतका विकोपाला गेला की अनिलने दारूच्या नशेत प्रियाच्या अंगावर घरातील रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वत:वर रॉकेल ओतून स्वत:लाही पेटवून घेतले. या घटनेत दोघंही गंभीर जखमी झाल्याने दोघांना उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले.

गुरूवारी अनिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रियावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र गुरूवारी सायंकाळी प्रियाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात मृत अनिल धारीया विरोधात ३०२ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT