Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : नरीमन पॉईंट ते विरार फक्त ३५ मिनट, कोस्टल रोड प्रोजेक्टवर मोठी अपडेट

Mumbai Coastal Road latest government announcement : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. नरीमन पॉइंट ते विरार हा प्रवास फक्त ३५ ते ४० मिनिटांत होईल, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलेय. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Coastal Road Extension : कोस्टल रोड प्रजेक्टमुळे मुंबईकरांना अनेक फायदे झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांना वाहतूककोंडीतून सुटका झाली. ट्रॅफिकमधून सुटका तर मिळालीच पण वेळ आणि पैसाही वाचतोय. आता कोस्टल रोड कामासंदर्भात मोठी अपडेट समोर आली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कोस्टल रोडसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यास नरीमन पॉईंट ते विरार (Nariman Point to Virar in Just 35 Minutes) हा प्रवास फक्त ३५ ते ४० मिनिटात पूर्ण होईल. (Nariman Point to Virar travel time coastal road update)

मुंबईकरांसाठी फायद्याचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत रविवारी एक महत्त्वाची अपडेट दिली. ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत विस्तारणाऱ्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील सर्व मोठे अडथळे दूर झाले आहेत. काम लवकरच सुरू होईल. हा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हपासून वरळीपर्यंत जातो. हा प्रकल्प वांद्रे-वरळी सी लिंकला जोडला जातोय. पुढच्या टप्प्यात हा रस्ता मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेल्या वर्सोवा आणि नंतर विरारपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्लान आहे.

विरार-नरीमन पॉईंट फक्त ४० मिनिटात प्रवास

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, कोस्टल रोडचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर नरीमन पॉइंट ते विरार हा प्रवास फक्त ३५ ते ४० मिनिटात पूर्ण होईल. दरम्यान, या प्रवासासाठी सध्या २ ते ३ तास हा वेळ लागतो. गोयल म्हणाले की, 'कोस्टल रोडच्या प्रकल्पाशी संबंधित सर्व मंजूरी मिळाल्या आहेत. जमीन संपादन, मिठागर जमिनीचे हस्तांतरण आणि कोस्टल रेग्युलेशन झोन, पर्यावरण मंत्रालय आणि वन विभागाकडून मंजूरी मिळाली आहे. मुंबईत कोस्टल रोडच्या सुरुवातीच्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यामुळे मुंबईकरांच्या खूप सोयी झाल्या आहेत.'

पर्यटकांना होणार फायदा -

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी कोस्लट रोडसंदर्भात रविवारी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर गोयल यांनी सांगितले की, हा प्रोजक्ट तयार झाल्यानंतर नरीमन पॉईंट ते विरर हा प्रवास फक्त ३५ मिनिटात होऊ शकतो. कोस्लट रोड प्रजोक्टमुळे पर्यटन वाढेल. त्याशिवाय पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. या प्रोजक्टसाठी केंद्र आणि राज्यातील दोन्ही विभागी संदर्भात चर्चा होत आहे. या प्रजोक्टचा फायदा फक्त उत्तर मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबईतील सर्वांना होणार आहे. त्याशिवाय मुंबईमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांनाही या कोस्लट रोडचा फायदा होणार आहे. भविष्यात दहिसर आणि विरारपर्यंत कोस्टल रोडचा विस्तार करण्याची योजना असल्याचेही गोयल म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: घर नाही तालीम नाही, नंदी बैल फिरवणाऱ्याच्या लेकाने पटकावलं सुवर्णपदक; कुस्तीपटू सनी फुलमाळीचा प्रवास

Pune Kukri Gang : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

SCROLL FOR NEXT