Navi Mumbai Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: हात्ती जेला ना शेपुट रला..; नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासाठी राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Navi Mumbai Airport Name: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदेंना पत्र दिलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MLA Raju Patil letter To Cm:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरणाचा वाद अजून मिटलेला नाहीये. दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रापुढे मांडण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. राजू पाटील यांनी हे पत्र आगरी भाषेत पत्र लिहिलंय. (Latest News on Maharashtra)

या पत्रातून त्यांनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव देण्याची विनंती केली. जर ही विनंती मान्य केली नाही. तर आगरी समजातील जनता नाराज होईल आणि सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करेल ,असा इशाराही त्यांनी दिलाय. आगरी कोळी समाजाचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची मागणी खूप दिवसांपासून केली जातेय. ही मागणी लक्षात घेता राज्य सरकारकडून २५ ऑगस्ट २०२२ रोजी विधानसभेत केंद्रासमोर नामकरणाचा प्रस्ताव मांडला जाईल, असा सांगण्यात आलं.

विधीमंडळातील दोन्ही सभागृहात या प्रस्तावाला मान्यता मिळाली. परंतु याविषयीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे पाठवण्यात आलेला नाहीये. दरम्यान नामातरांची मागणी जेव्हा जोर धरत होती, त्यावेळी राज्य सरकारनं विधीमंडळातील दोन्ही सभागृहात ही मागणी मान्य केली होती. परंतु नामकरणांचा प्रस्ताव केंद्राकडे अजून गेला नसल्यानं आगरी समाजाकडून नाराजी व्यक्ती केली जातेय.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही नामकरणांची आठवण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आगरी भाषेत पत्र लिहिलंय. नामकरणांचा प्रस्ताव अद्याप केंद्रापुढे मांडण्यात आला नसल्यानं राजू पाटील यांनी याची खंत व्यक्त केलीय. तसेच प्रस्ताव का मांडण्यात आलेला नाही, याची विचारणा देखील राजू पाटलांनी केलीय. राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नसल्यानं सरकारच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित होत असल्याचं ते या पत्रातून म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांची नेहमी दिल्ली वारी होत असते. एखाद्यावेळी विमानतळाच्या नामकरणांची फाईल नेली पाहिजे. भरलेल्या घागरीला सूपाचं ओझं होत नसते, असं म्हणत पाटलांनी सरकारवर टीका केलीय. नामकरणांच्या नावावरून सरकार आगरी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आगरी समाज त्याला चांगला धडा शिकवेल, असा इशाराही राजू पाटील यांनी आपल्या पत्रातून दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT