डोंबिवली : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे. शिंदे हे आपला गट एखाद्या राजकीय पक्षात विलीन करतील अशी चर्चा आहे. त्यातच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे यांनी फोन केला होता. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे.
याविषयी मनसेचे एकमेव आमदार व विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी आपली प्रतिक्रीया दिली ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून मी राज साहेबांच्या संपर्कात नाही. प्रसार माध्यमांच्या मार्फतच मला हे समजले आहे की राज साहेब यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.
हे देखील पाहा -
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत, मधे नेतृत्वाच्या काही अडचणी असतील त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. सध्या जे राजकारण सुरु आहे, ते पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे. त्यामुळे या घडीला आम्हाला त्यांच्यात काही रस नाही. शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला याला अनेक कारणे असल्याचंही ते म्हणाले.
मात्र, या सर्वामधील एक कारण म्हणजे त्यांनी सांगितलेला हिंदूत्वाचा मुद्दा, जो मुद्दा आम्ही राज साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात आहोत. हे काही कॉमन मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने जवळीक होऊ सुद्धा शकते. परंतु सर्वस्वी निर्णय हा राज साहेबांचा असून त्यावर मी काही भाष्य करु इच्छित नाही असंही पाटील म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.