Crime Saam TV
मुंबई/पुणे

२५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून हत्या; दोघांना अटक

मिरा रोड मधील धक्कादायक घटना

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई विरार - मीरा रोड येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी १४ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार मिरा रोड (Mira Road) येथे उघडकीस आला आहे. काशिमिरा पोलिसांनी (Police) याप्रकरणी २ आरोपींना अटक केली आहे.

मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग ही महिला दोन मुलांस राहते. ती बोरिवलीच्या एका बार मध्ये गायिका म्हणून काम करते. रविवारी रात्री ती नेहमप्रमाणे कामावर गेली होती. रात्री १२ च्या सुमारास तिचा १ मुलगा हा घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पाहा -

त्यानंतर मंगळवारी दुपारी या मुलाचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलाची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे त्यांना वाटले. पैशांच्या आमिषाने त्यांनी मुलाचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता.

दरम्यान, त्या मुलाला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काशिमिरा पोलीस सखोल तपास करीत असून त्यांनी नेमकी हत्या का केली. खंडणी साठी की अन्य काही कारण होते याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT