Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता; कपिल पाटलांचं खासदार बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर

kapil patil News : भाजपचं तिकीट वाटू नका, माझ्यात प्रचंड क्षमता आहे, असं म्हणत कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 'माझी हिम्मत कुणाला बघायची गरज नाही. माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. मी कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांना लगावला आहे.

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यान, विद्यमान खासदार सुरेश मात्रे यांनी हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान माजी केंद्रीय मंत्री पाटील यांना दिलं होतं. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे.

'सुरेश म्हात्रे यांना विचारायची गरज काय, तुमच्या पक्षाचं बघावं, माझ्या पक्षाची तिकीट वाटू नका, लोकांनी सेवा विकास करण्याची संधी दिली आहे. विकास करायचा विचार करा, कपिल पाटील यांचं नाव घेण्याशिवाय याना टीआरपी मिळत नाही. मला पक्षाने सांगितलं लढा, तर मी लढणार. मला काय यांची परवानगी पाहिजे का ? असा सवाल करत कपिल पाटील यांनी बाळ्यामामांना टोला लगावला. 'आम्ही हार पचवून पाच तारखेपासून कामाला लागलो, त्यांना विजयही पचवता आलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला.

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे अबू आझमींना प्रत्युत्तर

'मुंबई घडवण्यात उत्तर भारतीयांचं मोठं योगदान आहे. मला गृहमंत्री बनवलं तर मी राज्यातील दूषित वातावरण शांत करणार, असं वक्तव्य करणारे सपाचे नेते, आमदार अबू आझमी यांना कपील पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर बोलताना माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते कपिल पाटील यांनी उत्तर प्रदेशमध्ये त्यांची सत्ता होती. तेव्हा तिथे का नाही केलं, त्यासाठी योगींना याव लागलं. मुंबईच्या जडणघडणीमध्ये जास्तीत जास्त लोक मराठीच होती. मी असा दावा करणार नाही. मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी आहे. इथे सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे.मुंबईच्या जडणघडणीत सर्वांचं योगदान आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न कुणी करत असेल, तर ते चुकीचं आहे, असा पलटवार माजी केंद्रीय मंत्री कपिल यांनी अबु आझमी यांच्यावर केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT