Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे यांचे बंडखोरीनंतर दुसरे ट्विट; उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंडखोरी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई अटळ असा इशारा या आमदारांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक शिवसेनेकडून संबधित आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन आव्हान दिले आहे. (Eknath Shinde latest News)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून (Shivsena) या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच, शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई अटळ असा इशारा या आमदारांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक शिवसेनेकडून संबधित आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन आव्हान दिले आहे. (Eknath Shinde latest News)

प्रताप सरनाईक यांचे 'ते' पत्र व्हायरल

विधान परिषद निवडणुकीच्या (Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काल (मंगळवार) शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठले होते. त्यांच्यासोबत ३३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणील आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे एक जुने पत्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे समोर आले आहे.

'गेल्या दिड वर्षात आपण मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. कोरोना काळात आपण केलेल्या कामाचे कौतुक अनेकांनी केले आहे, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. राष्ट्रवादीचे नेते सेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्यात येत आहे, तसेच ईडीपासून वाचण्यासाठी सोबत असणाऱ्या पक्षातील नेते केंद्रीय नेतृत्वासोबत संधान साधत आहेत. तर आपल्या नेत्यांना ईडीकडून त्रास दिला जात आहे, असं या पत्रात म्हटले आहे.

'पुढच्या वर्षी मुंबई, ठाणेव अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी, युतीच्या नेत्यांसोबत आपले संबंध चांगले आहेत. ते संबंध तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल, तर त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला (Shivsena) भविष्यात होईल अस या पत्रात प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT