Residents of Runwal Garden in Dombivli stage a protest outside the builder’s office over severe water shortage issues. saam tv
मुंबई/पुणे

पाण्याअभावी रहिवासी हैराण; डोंबिवलीत बिल्डरविरोधात जोरदार आंदोलन

Runwal Garden Dombivli Water Shortage Protest Details: डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील रुणवाल गार्डन प्रकल्पात तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त रहिवाशांनी बिल्डर कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली नजीक मानपाडा परिसरातील रुणवाल गार्डन या प्रकल्पात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. रुणवाल रेसिडेन्सी कंपनीकडून मानपाडा येथे रुणवाल गार्डन हा मोठा निवासी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण सहा फेजचे नियोजन असून सध्या तीन फेजमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. या तीन फेजमध्ये सुमारे साडेचार हजार कुटुंबे राहत असून जवळपास १५ हजारांची वस्ती येथे आहे.

या परिसराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाणी व्यवस्थापनाचे काम बिल्डरकडील कर्मचाऱ्यांमार्फत केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अनेक सोसायट्यांचे व्यवस्थापन रहिवाशांकडे हस्तांतरित होऊन तीन वर्षे उलटूनही स्वतंत्र पाण्याचे मीटर देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिल्डरकडून प्रकल्पाच्या इतर कामांसाठीही हेच पाणी वापरले जात असून रहिवाशांना व्यावसायिक दराने पाणीपुरवठा करून आर्थिक फायदा घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेषतः ईडब्ल्यूएस इमारतींना मागील काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी संतप्त रहिवाशांनी रुणवाल विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी बिल्डरविरोधात घोषणाबाजी करत पाण्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच पाण्याच्या समस्येवर उपाय करण्याऐवजी सोसायट्यांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम बिल्डरकडून होत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला.

बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करत पाणी समस्येमागील कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या उत्तरांवर नागरिक समाधान व्यक्त करत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT