Eknath Shinde and ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

अजित पवारांनी पूरपरिस्थितीवरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; 'आम्ही उंटावरून...'

राज्यात दोन जणांचं मंत्रिमंडळ असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने काही जिल्ह्यांना चांगलंच झोडपलं. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. राज्यातील ज्या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनत नुकसान झालं. दरम्यान, राज्यात केवळ दोन जणांचं मंत्रिमंडळ असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde News )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार हे दौऱ्यावर थोडे उशिरा पोहोचले आहे. गडचिरोलीच्या टोकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी असे दोघे गेलो होतो. पूर ओसरल्यानंतर अजितदादा गेले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया याठिकाणी जेव्हा पूर परिस्थिती होती, तेव्हा फिरत होते. आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही'.

'जेव्हा राज्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती होती. त्यावेळी आमची संपूर्ण यंत्रणा मदत करत होती. आज युद्ध पातळीवर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे.सरकार शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन-तीन दिवसांत १०० टक्के पंचनामे होतील. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल. यात मी आणि उपमुख्यमंत्री जातीने लक्ष देत आहे. कॅबिनेटमध्ये देखील याचा आढावा घेतला आहे. मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात सरकार आहे. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही', असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT