Ambernath Crime
Ambernath Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath Crime: परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; 5 जणांना ठोकल्या बेड्या

अजय दुधाणे

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा ठाणे गुन्हे शाखेने धाड टाकत पर्दाफाश केला आहे. या धाडीत पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस पार्क या इमारतीत हे बोगस कॉल सेंटर सुरू होतं. या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या २३३ नंबरच्या युनिटमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरू करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

या कॉल सेंटरमधून (Call Centre) परदेशातील नागरिकांना आपण एक्सफिनिटी कंपनीतून बोलत असल्याचं सांगत त्यांना इंटरनेट सेवा ऑफर, तसंच बक्षीसांची आमिषं दाखवली जायची. त्यानंतर त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स मिळवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जायचे. याबाबत ठाणे (Thane) गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली.

या ठिकाणी परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ॲलेक्स डेव्हिड बासरी, मिल्टन मेल्विन मंतेरो, श्रीकांत जयप्रकाश पवार, आकाश विनोद ठाकूर आणि पंकज रतनसिंह गौड या पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर फसवणुकीसह कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांचा ताबा सध्या गुन्हे शाखेकडेच आहे. त्यांच्या या बोगस कॉल सेंटरमधून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, तसंच त्यांनी लाटलेली रक्कम नेमकी किती आहे? या सगळ्या बाबी आता गुन्हे शाखेच्या तपासात समोर येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT