Mumbai Power Supply: मुंबईत अनेक भागात वीज पुरवठा खंडित Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Power Supply: मुंबईत अनेक भागात वीज पुरवठा खंडित

मुंबईमध्ये बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईमध्ये बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित (Electricity failure in Mumbai) झाला आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईमधील (Mumbai ) वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील वडाळा (Wadala), दादर, वरळी या भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, वीज पुरवठा (Power supply) करणाऱ्या मुलुंड- ट्रॉम्बे या लाईनवर मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडाने मुंबईमधील (Mumbai ) वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील काही तासाभरापासून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे. रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकामध्ये आजून देखील वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. यामुळे चर्चगेट स्थानकातून ट्रेन सुटण्यास अडथळे येत आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत होण्याकरिता आणखी काही काळ लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT